ग्रामपंचायत बेलगाव कुऱ्हे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More →

वाचनालय

picture9

बेलगाव कुऱ्हे गावात १५००० पुस्तकांचे मोठे ग्रंथालय असून प्रशासकीय भव्य इमारत देखील उपलब्ध आहे . याचा फायदा गावातून तरुणांना व आजू बाजू च्या सर्व विद्यार्थ्यांना व वाचन प्रेमीस होतो .

स्पर्धा परीषेची पुस्तके , गाथा , येत्याषिक पुस्तके , गोष्ठी , दंत कथा अशी अनेक पुस्तके वाचनालयात उपलब्ध आहे .

समाजाच्या विविध गरजापैकी वाचन ही एक अत्यंत महत्वाची गरज आहे, किंबहुना ती अन्न, वस्त्र, निवारा या गरजा इतकीच महत्वपूर्ण आहे.

विकसनशील राष्ट्रातील समाज सुसंस्कृत व प्रगतशील होण्यासाठी त्याठिकाणची शालेय ग्रंथालये समृद्ध होणे काळाची गरज आहे.

प्राचिन काळापासून आजपर्यंत ज्ञानाचे संप्रेषण विविध माध्यमातून होत असून त्यात मौखिक स्वरूपात, तर कधी झाडाच्या सालीवर, वीटावर, कातडीवर, कोळसा या साधनाद्वारे अक्षरे लिहून होत असे.

छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळे पुस्तके प्रकाशनाचा वेग वाढला. ही प्रकाशित वाचनसाहित्य संपदा विविध प्रकारच्या ग्रंथालयामध्ये संग्रहित होऊ लागली.

भारतात पुर्वी तक्षशिला, नालंदा, विक्रमशीला वल्लभी सारखी मोठमोठी ग्रंथालये अस्तित्वात होती. ही ग्रंथालये भारतातील व भारताबाहेरील विद्वानांचे लक्ष आकर्षून घेत होती. ही ग्रंथालये म्हणजे एक-एक विद्यापीठच होते.

शालेय शिक्षणाचा काळ विद्यार्थी जीवनात फार महत्वाचा असतो. त्यादृष्टीकोणातून त्याना शिक्षण मिळाले पाहिजे. विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा हाच काळ असतो. त्यामुळे त्यांना भविष्याची ज्ञानरूपी शिदोरी मिळाली पाहिजे म्हणजे विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल होते. लहान वयात जेवढे संस्काररुपी वाचन होईल ते भाविष्यासाठी उपयोगी पडते.

आज आपण पाहतो की ग्रामीण भागातील शाळेमध्ये फक्त रट्टामार शिक्षण दिले जाते. फक्त परीक्षाभिमुख पुस्तकातील अभ्यासक्रम शिकविला जातो. अवांतर वाचनाची पुस्तके वाचनासाठी दिली जातात ना शालेय ग्रंथालयात पुस्तके असतात. काही शालेय ग्रंथालयात पुस्तके असतीलही परंतु ती विद्यार्थी वाचतात ना शिक्षक, फक्त ग्रंथालयाच्या कपाटात बंद कुलुपात असतात.

काही शाळेला ग्रंथपाल पद असते परंतु ते ग्रंथालयाचे काम करत नाहीत तर त्यांना शाळेच्या कार्यालयात लिपिकाचे काम करावे लागते म्हणून ग्रंथवाटपाचे कार्य ग्रंथालयात होताना दिसत नाही व ग्रंथ वाचकापर्यंत पोहचत नाही म्हणून शालेय विद्यार्थी वाचकांना अवांतर वाचनाची गोडी लागत नाही व त्याचे अवांतर वाचन होत नाही.

शालेय शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थ्यापुढे परिस्थतीनुरूप दोन पर्याय असतात एक उच्चशिक्षणाचा आणि दुसरा उपजिविकेसाठी काही व्यवसाय करण्याचा. शालेय शिक्षणाच्या काळात विदयार्थ्यांना या दोन्ही पर्यायांना सामोरे जाता येईल, अशी त्यांची मानसिक तयारी झालेली असली पाहिजे. या काळात विदयार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक व भावनात्मक शक्तीचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी विदयार्थ्यांना ज्ञान संपादनाची विविध साधने उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. या साधनांचा उपयोग करण्याचे शिक्षणशाळांनी विदयार्थ्यांना दिले पाहिजे. ​

पाणीपुरवठा

picture10

पाणीपुरवठा गावातील सर्व कुटुंबाना घरोघरी नळ उपलब्ध आहेत , पाणीपुरवठा रोज केला जातो , प्रा . आरोग्य केंद्र यांच्या कढून वेळोवेळी पाणी तपासणी केली जाते .

प्राथमिक आरोग्य केंद्र

picture12

प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) ही आरोग्य व्यवस्थेतील सर्वात खालची पातळी असून, ती दुर्गम भागातील लोकांपर्यंत मूलभूत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे . या केंद्रांमध्ये प्रतिबंध, उपचार, आरोग्य शिक्षण आणि पुनर्वसन यासारख्या सेवा पुरवल्या जातात. मुख्य कार्ये:
समुदायाला आरोग्य सेवा पुरवणे: व्यक्ती, कुटुंब आणि समुदायाला आवश्यक आरोग्य सेवा देणे हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.
प्रतिबंधात्मक सेवा: रोग प्रतिबंधक औषधोपचार आणि आरोग्य शिक्षण देऊन रोगांचा प्रसार रोखणे.
उपचार सेवा: सामान्य आजारांवर उपचार करणे आणि गरज पडल्यास पुढील संदर्भासाठी रुग्णांना मोठ्या आरोग्य केंद्रांमध्ये पाठवणे.
माता आणि बाल आरोग्य सेवा: गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी विशेष आरोग्य सेवा.

पाणी आणि स्वच्छता: सुरक्षित पाणी आणि मूलभूत स्वच्छतेची सोय करणे. रचना: • एक प्राथमिक आरोग्य केंद्र साधारणपणे एका मोठ्या गावात असते. • प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राखाली ५-६ उपकेंद्रं असतात, जी अत्यंत ग्रामीण भागातील लोकांसाठी सेवा देतात. • या केंद्रात डॉक्टर, नर्सेस, कंपाउंडर आणि इतर आरोग्य कर्मचारी काम करतात.

महत्त्व:

• लोकांना घरबसल्या आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होते.
• आरोग्य व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे आरोग्य आणि कल्याणाची खात्री होते.

🏡 प्रधानमंत्री आवास योजना – पिंपळगाव भटाटा ग्रामपंचायत

blank image

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सोयी असलेले घरे उपलब्ध करून दिली जातात.

क्रीडांगण

picture15